• ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
Sunday, June 1, 2025
Dharashiv Davandi
  • Login
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
Dharashiv Davandi
No Result
View All Result

मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा; नाना पटोलेंची राज्य सरकारकडे मागणी

Vaibhav by Vaibhav
October 10, 2023
in अर्थव्यवस्था, कृषी, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा; नाना पटोलेंची राज्य सरकारकडे मागणी
0
SHARES
0
VIEWS

मुंबई – राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे, धरणाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचे सरकारने पालन करावे तसेच मराठवाड्यातील परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मराठवाडा विभागाची आढावा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर नांदेड, हिंगोली, परभणी धाराशिव, बीड या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना क्ष नाना पटोले म्हणाले, सात तारखेपासून विभागानिहाय आढावा बैठका सुरु आहेत. आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. उदयपूर शिबिरातील बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे की नाही त्याचा आढावा घेतला जात आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत करून प्रत्येक घटकापर्यंत काँग्रेस विचार पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका घेतलेली आहे. उदयपूर शिबिरातही काँग्रेसने यासंदर्भात निर्णय घेतला होता. आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजात वाद होताना दिसत आहेत. २०१४ मध्ये भाजपाने मराठा, धनगर, गोवारी, ठाकूर समाजाच्या लोकांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते पण देशात व राज्यात भाजपाचे सरकार आले पण त्यांनी आरक्षण त्यांनी दिले नाही.

२०२१ साली जनगणना होणे अपेक्षित होते पण ती आजपर्यंत झालेली नाही, भाजपा मुद्दाम जनगणना करत नाही. संभाजी नगरमधील घाटी रुग्णालय, नांदेड, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात औषधे मिळाली नाहीत म्हणून लोकांचे मृत्यू झाले. उच्च न्यायालयानेही सरकारवर याप्रश्नी कडक तोशेरे ओढले पण भाजपाचे आंधळे, बहिरे सरकार त्याकडे लक्ष देत नाही.

केंद्रातील भाजपाचे सरकार विरोधी पक्षाला वाईट वागणूक देत आहे. दडपशाही व दहशत निर्माण करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. सोनिया गांधी व राहुलजी गांधी यांनाही भाजपा सरकारने चौकशीच्या नावाखाली अत्यंत वाईट वागणूक दिली. सोनियाजी गांधी आजारी असतानाही भाजपा सरकारने त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावून चौकशीच्या नावाखाली त्रास दिला. सोनियाजी व राहुलजी यांचा भाजपा सरकारने केलेला हा अपमान काँग्रेस कार्यकर्ता कदापी विसरणार नाही.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेडच्या रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांची कमतरता आहे, केवळ तीन नर्सेस होत्या. औषधांची कमतरता होती, सरकारने आरोग्य विभागाकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. सर्वच शासकीय पदे सरसकट कंत्राटी पद्धतीने भरु नयेत. तहसिलदार व नायब तहसिलदार अर्धन्यायीक पदे खाजगी पद्धतीने भरू नयेत. सफाई कामगार, सुरक्षा रक्षक सारखी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाऊ शकतात पण महत्वाची शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरु नयेत. आरोग्य व शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. त्यातही दत्तक योजना सारखे प्रकार आणले जात आहेत. राज्यात आज शिक्षक, पोलीस दलासह विविध विभागात रिक्त जागा आहेत सरकार त्या रिक्त जागा का भरत नाही? असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.

Previous Post

व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी अकिब पटेल यांची नियुक्ती

Next Post

माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा,अन्यथा देशभर आंदोलन उभारणार

Related Posts

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम
ग्रामीण

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
अर्थव्यवस्था

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे
आरोग्य

आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

April 22, 2025
वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
अर्थव्यवस्था

वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

April 12, 2025
आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
अर्थव्यवस्था

आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

April 1, 2025
पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक
ग्रामीण

पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक

March 13, 2025
Next Post
माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा,अन्यथा देशभर आंदोलन उभारणार

माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा,अन्यथा देशभर आंदोलन उभारणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

ताज्या घडामोडी

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

April 22, 2025
वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

April 12, 2025
आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

April 1, 2025

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (22)
  • आरोग्य (11)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (8)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (51)
  • तंत्रज्ञान (23)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (70)
  • राजकारण (37)
  • शहरी (35)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (67)

Dharashiv Davandi

contact us at 9552416181

Gallery

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (22)
  • आरोग्य (11)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (8)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (51)
  • तंत्रज्ञान (23)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (70)
  • राजकारण (37)
  • शहरी (35)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (67)
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!